शिवचरित्र भाग 1 ( आणि पुण्याचं परगण्यासकट रूप बदलू लागलं ! )

 आणि पुण्याचं परगण्यासकट रूप बदलू लागलं !


इतिहासाने पाहिलं की ,उदात्त आणि उत्कट महत्वाकांक्षी गरूडझेपेपुढे आकाशही ठेंगण ठरलेलं होत . 350 वर्षा पूर्वी मराठी मातीवर नांगराला गाढव जुंपून तो इथं फिरवला होता . आदिलशाही फौजा घोडे कुदवत चारही दिशेनं पुण्यात घुसला . घरंदारं पेटवली , किंकाळ्या उठल्य, सैरावैरा धावणाऱ्यांची प्रेतं पडली. शाही फौजांनी पुण्याचा कसबा बेचिराख केला. फुटक्या कवड्या आणि तुटक्या वहाणांची तोरणं लटकवून आणि एक भली मोठी लोखंडी पहार भर रस्त्यात ठोकून शाही फौजा विजापुरास परतल्या. उरलं कुत्र्यांचं रडणं आणि पारी , गिधाडांचं आभाळात भिरभिरणं. पुण्याचं स्मशान झालं. अशी सहा वर्ष लोटली. शहाजी राजे भोसल्यांच्या पुणे जहागिरीचा उकिरडा झाला आणि सहा वर्षांनंतर पुण्यात शहाजीराजांची राणी आणि मुलगा मावळी घोडेस्वारांच्या तुकडीनिशी प्रवेशले. (इ.स. १६३७, बहुदा उन्हाळयात) पुण भकासच होतं. दहा-पाच घरं जीव धरून जगत होती.


पुण्याची ही मसणावट मालकिणीला राहण्यापुरतीही वाड्यांच्या बळचणीला या झालेली स्वतःची पाहून आऊसाहेबांचं काळीज ओसरी राजगृहिणीला उरली नव्हती. बिहार थाटावं करपलं. झांबरे लागलं. पुण्याच्या पाटलांच्या पण त्या क्षणाला जिजाऊसाहेबांच्या व्याकुळ काळजातून अबोल संकल्प उमलू लागले. या पुण्याचं आणि परगण्याचे रूपांतर आम्ही करू!


चार दिवस , चार रात्री उलटल्या आणि आऊसाहेबांनी सण साजरा करावा तशी पहिली ओंजळ वाहिली , ती पुण्यातल्या मोडून-तोडून गेलेल्या कसबा गणपतीच्या देवळात.पहिला जीणोद्ध्धार सुरू झाला, तो या गणेशाच्या मंदिरापासून. पुण्यातली भाजून पोळून निघालेली आठ घरं आणि बारा दारं किलकिली झाली. त्यांची आशा पालवली. घरातली माणसं रस्त्यावर आली. कसबा गणपती दुर्वा फुलांनी प्रथमच इतका सजला- पुजलेला पाहून आयाबायांना नक्कीच असं वाटलं की ही मायलेकर म्हणजे गौरीगणपतीच पुण्यात आले.


जिजाऊसाहेबांनी आज्ञा करावी आणि सर्वानी हौसेनं ती पूर्ण करावी , असा भोंडला पुण्यात सुरू झाला. पुणं पुन्हा सजू लागले. आऊसाहेबांच्या खास नजरेखाली एकेक नवानवा सजवणुकीचा डाव मुठेच्या वाहत्या काठावर रंगू लागला. पुण्यात लोखंडी शाही पहार केव्हाच उखडली गेली आणि एक दिवस हलगी-ताशांच्या कडकडाटात नांगराने बैल सजले. नांगर जुंपण्यात आला. नांगराचा फाळ लावला होता , सोन्याचा. खरं खरं सोनं बावनकशी. आणि पुण्याच्या भुईवर सोन्याचा नांगर पाचपत्रास पावलंनांगरण्यामाठी फिरला. याच भुईवर सहा वर्षांपूर्वी विजापूरच्या वजीरखवासवानाच्या हुकुमानं गाढव जुंपलेला नांगर फिरला होता. तरुणांच्या महत्वाकांक्षा जणू ढोल-लेझीमच्या तालावर सहा वर्षांच्या शिवबाच्या आणि आऊसाहेबांच्या सोन्याच्या नांगराभोवती फेर धरून उसळत नाचत होत्या. ती सुखावलेली मराठी जमीन जणू म्हणत होती, 'पोरांनो मनांत आणा , तुम्ही वाट्टेल ते करू शकाल. या मातीत मन मिसळलं की , मोती पिकतील.


आणि खरंच पुण्याचं परगण्यासकट रूप बदलू लागलं. माणसं स्वतःहून  कामाला लागली. बारा बलुतेदार आणि गावकामगार स्वत:चा संसार सजवावा तसं घाम गाळीत काम करू लागले. न्यायनिवाडे करायला स्वतः आऊसाहेब जातीनं सदरेवर बसू लागल्या. न्याय अगदी समतोल. तराजूच्या काठ्यावर माशीही बसत नव्हती. आऊसाहेबांनी या काळात दिलेल्या न्यायनिवाड्याचे दस्तैवज गवसला होता .


पुण्याच्या पर्वती गावालगतचा आंबिल ओढा फारच बंडखोर. पावसाळ्यात असा तुफान भरून वाहायचा की, अवतीभवतीची शेती आणि झोपड्या, खोपट पार धुवून घेऊन जायचा. हे दुखर्ण पुण्याला कायमचंच होतं. आऊसाहेबांनी पर्वताच्या जवळ (मध्याच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याच्या पश्चिमेस) या ओड्याला बांध घातला. चिरेबंदी ,चांगला सहा हात रुंद, सत्तर हात लांब आणि पंचवीस हात उंच. आंबोली ओढ्याचा प्रवाह कात्रजच्या घाटातून थेट उत्तरेला पुणे शहराला खेटून नदीला मिळत असे. हा प्रवाह या बांधामुळे वळवून घेऊन पश्चिमेकडे ( सध्याच्या दांडेकर पुलाखालून) मुठा नदीत सोडण्यात आला.


पुण्याच्या अवतीभवती सगळे मावळी डोंगर जंगल अफाट, गेल्या सहा वर्षांत वाघांचा, बिबट्यांचा अन् लांडगा- कोल्ह्याची धुमाकूळ बादशाह सरदार यांच्यापेक्षाही थैमान घालत होत्या . ही रानटी जनावरं मारून काढून शेतकऱ्यांना निर्धास्त करायची फार गरज होती. आऊसाहेबांच्या लालमहालात लोकांकरवी ही कामगिरी करून घेतली.रानटी जनावरांचा धुमाकूळ थांवला.


पण प्रतिष्ठित गावगंडांचा धुमाकूळ थांबविणं जरा अवघडच होतं. आऊमाहेबांच्याच हुकुमानं कृष्णाजी नाईक , फुलजी नाईक, बाबाजी नाईक पाटील, इत्यादी दांडग्यांना जबर शिक्षा करून जरबेने आणलं, कुणाकुणाचे हात पाय तोडले. काय करावे ?प्रत्येकाला कुठे आणि किती शहाणं करीत बसावं ? तोही मूर्खपणाच ठरतो.लालमहालातील मायलेकरांची स्वप्न आणि आकांक्षा गगनाला गवसण्या घालत होत्या.

Post a Comment

0 Comments