शिवचरित्र भाग 2 ( संजीवनी लाभू लागली... )

 संजीवनी लाभू लागली...


आदिलशहाने पुणे परगण्याची जहागिरी शहाजी राजांच्या नावाने दिली होती. शहाजीराजांना दक्षिण कर्नाटकातही आदिलशहाने जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी दक्षिणेकडे केली.त्याचवेळी शहाजीराजांनी पुणे जहागिरीचा सर्व कारभार शिवाजीराजे यांसी अर्जानीमोकास दिला. शिवाजीराजे पुणे जहागिरीचे पोट मोकासदार झाले. म्हणजेच प्रत्यक्ष कारभार जरी शिवाजीराजांच्या नावाने झाला, तरी वडीलकीच्या नात्याने तो कारभार जिजाऊसाहेब पाहू लागल्या.त्यांची माया ममता मोठी. जरबही मोठी. स्वप्नही मोठे. जी माणसं कारभार पाहण्याकरता म्हणून पुणे जहागिरीकडे शहाजीराजांनी नेमून दिली तीही फार मोठ्या योग्यतेची दिली. शिस्तीनं , काटेकोरपणे हुकुमात वागणारी. कारभार चोख करणारी. निष्ठावंत आणिप्रामाणिक, अशी माणसं असली की , उत्कर्षच होत असतो. मग ते छोटे संसार असोत की मोठी साम्राज्ये अमोत. उत्तम अनुशासन ही हुकमी शक्तीच असते. 


पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहणारे सगळेच कारभारी अनुभवी , भारदस्त , वयानेही बहुतेक साठ सत्तर वर्ष पूर्ण झालेले होते . बाजी पासलकर, दादोजी कोंडदेव , गोमाजी नाईक,पानसंबळ नूरखानबेग , बंकीराव गायकवाड, येसबा दाभाडे , नारोपंत मुजुमदार आणि असेच तजरुवेकार आणखी काही. 'ज्यास जे काम सांगितले , ते त्याने चोख करावे 'ऐश्या ताकदीचे आणि युक्ती बुद्धीच्या ऐपतीचे हे सारे होते. जिजाऊसाहेबांची तडफ वेगळीच होती. कर्तबगारीचे आणि समतोल न्यायबुद्धीचे संस्कार त्यांच्यावर नेमके कोणी केले ? इतिहासाला त्यांची नावे माहीत नाहीत. पण कथा कीर्तनातील पौराणिक स्त्रियांचं चरित्रं सर्वां प्रमाणे त्यांच्याही मनावर नक्कीच संस्कार करीत होती. प्रत्यक्ष नजिकच्या काळात शाही घराण्यात कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रियांची एकेक हकीकत जुन्या लोकांकडून त्यांच्याही कानांवर जात असणारच. आदिलशाहीतील बेगम बबुवाजीखानम, अहमदनगरची शहजादी चाँदबिब्बी आणि त्यापेक्षाही प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळ मुलुखातील कितीतरी मराठ्यांच्या लेकीसुना त्यांना दिसत होत्या ना ! कारीच्या कान्होजी जेध्यांची आई अनसाऊ जेधे ही त्यातलीच. आसवलीच्या ढमाळ पाटलांची आई रुपाऊ आणि अशा अनेक कितीजणी यमदूतांच्या नजरेला नजर भिडवून जगत आलेल्या बायका आऊसाहेबांना दिसत होत्या. स्वतःहून माणसांनी शिकायचं असतं ते हेच! असंच. मराठी रक्तात जन्मता:च असणार शौर्य आणि धैर्य आऊसाहेबांच्या रक्तात होत.


 एका बखरकारांनी लिहून ठेवलंय की, 'जिजाऊ सारखे कन्यारत्न ईश्वरानेच निर्माण केले कितीही कठीण मंकटं पुढे आली ,तरी तिळमात्रही न डगमगता धैर्याने तोंड देणारी होती ही मराठ्याची मुलगी.आऊसाहेबांना आपला शिवबा उदात्त उत्कट आणि उत्तुंग यशाचा मानकरी करायचा होता. याचे द्योतक  म्हणजे शिवाजीराजांची तयार झालेली राजमुद्रा प्रतिश्चंदलेखेव वधिर्ष्णूविश्ववंदिता साहसूनो शिवस्येषा  मुद्रा भदाय राजते  केवढा उत्तुंग आणि उदात्त ध्येयवाद सांगितलाय या राजमुद्रेत! सदैव प्रतिपदेच्या चंदामारखी विकसित होत जाणारी ही शिवमुद्रा विश्वाला वंद्य आणि लोककल्याणकारी ठरो. संजीवनी नावाचा एक विलक्षण मंत्र विश्वाच्या कल्याणासाठी कचाने मिळविला म्हणे! तोच हा मंत्र असेल का? शिवाजीराजांच्या आज्ञापत्रांवर हाच मंत्र राजमुद्रा म्हणून झळकू लागला आणि शिवाजीराजांचा वावर सुरू झाला. मावळातल्या शेतकरी सवंगड्यात कोणी मराठा, कोणी माळी, कोणी माळी , कोणी तेली , कोणी रामोशी, कोणी महार, कोणी धनगर, कोणी ब्राह्माण तर कोणी मुसलमानही. आणि आदिलशहाच्या कानाशी कुजबुजत तक्रारी जाऊ लागल्या की , हा शहाजी राजाचा पोरगा हलक्या लोकांमध्ये वावरतो. मुहम्मद आदिलशहा ने ही कुजबुज हसण्यावारी नेली. त्याचा विश्वासच बसत नव्हता की , शहाजीराजांचा एवढासा पोरगा मावळी डोंगरात बंड पुकारीत आहे म्हणून , या आदिलशाही विरुद्ध ? कस् शक्य आहे ? पण ते सत्य होतं. खरोखरच बंडाची राजकारण शिवबाच्या डोक्यात घुमत होती. पण खरंच शक्य होतं का ? अशक्य होतच . शिवाजीराजांच्या समोर केवळ आदिलशाही होती का ? नाही.


 दीड दोन लाखाची फौज सहज उभी करू शकणाऱ्या आदिलशहा शिवाय पलीकडे गोवळकोंड्याचा कुतुबशहाही होता. भीमा नदीच्या उत्तरेला भीमेपासून थेट हिमालयापर्यंत प्रचंड साम्राज्य आपल्या तळहातावर नाचवणारा मुघल बादशहा शाहजहान दिल्लीत होता. कोकणच्या किनाऱ्यावर खाली पोर्तुगीज होते. वर जंजिऱ्याचा सिद्दी होता. आणि शिवाय इथल्या कुठल्याही चांगल्याकामाला कडाडून विरोध करीत या सर्व शत्रूंना मदत करणारे आमचे लोकही होतेच. एवढ्या मोठ्या बळाला तोंड देण्याइतका शिवाजीराजांपाशी काय होतं ? सैन्य ?तोफखाना ? आरमार ? खजिना ? काहीच नव्हतं. पण या सर्वांहुनही एक बलाढ्य गोष्ट त्यांच्या काळजात होती. ती म्हणजे आत्मविश्वास! कठोर ध्येयनिष्ठा! आणि नितांत श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे. भाबडी अथद्धाही नव्हे. बुद्धिनिष्ठ श्रद्धा. अभ्यासपूर्ण श्रद्धा. आणि याच भावनेने भारावलेली मावळी भावंडे. अशाच असंख्य भावंडांना ते हाका मारीत होते. न बोलत्या शब्दात. कारण त्यांचे शब्द इतिहासाच्या कागदपत्रांवर फारसे उमटले नाहीत. पण ते नक्की एकेकाला बोलावत होते. त्यांचा एकेक शब्द मंतरलेला होता. महाराजांचे मनुपयवळ बोटे मोजावीत इतक्याच मोजमापास वाढत होतं. शत्रू परातभर होता. मावळे चिमूटभर होते. पण वडिलांनी वापरलेला आणि सह्याद्रीने शिकवलेला एक महामंत्र शत्रूच्या महाराजांच्या मस्तकात जास्तीत जास्त फौजेचा सदैव जागा आपल्या होत्या . कोणता ? गनिमी कमीत कमी फौजेनिशी आणि कावा! कमीत कमी युद्धसाहित्यानिशी , कमीतकमी वेळांत पूर्ण पराभव करण्याची शक्ती होती या गनिमी काव्यात .

Post a Comment

0 Comments