शिवचरित्र भाग 4 ( झडप बहिरी ससाण्याची ... )

 झडप बहिरी ससाण्याची ...



विजापूरच्या आदिलशाही सरदार फत्तेखान हा मोठी फौज घेऊन कऱ्हेपठारात (पुरंदर तालुक्यात) दाखल झाला। त्याचा तळ जेजुरी जवळच्या बेलसर गावाजवळ पडला। त्याला खात्री होती की , शिवाजीराजांचे बंड आपण लवकरात लवकर साफ मोडून काढून टाकू । त्यांनी आपल्या सैन्याचा एक विभाग शिरवळ ला पाठवला होता . नीरा नदीच्या काठी शिरवळला एक भुईकोट किल्ला नव्या स्वराज्यात राजांनी त्याला तंबीत घेतलेलं होत . त्याचं नाव ‘ सुभानमंगळ ‘. शाही फौज मोठी होती. राजाने सुभानमंगळ एका घावातच जिंकला. मराठ्याचा हा स्वराज्यातील पहिला पराभव होता . शहाजीराजे विजापुरात कैदेत पडलेले होते . कोणत्याही वेळी बादशहा शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती होती . पूर्वी असे सगळ्याच बादशहांनी खूप लोक मारून टाकल्याच्या आठवणी ताज्या होत होत्या. कोणाचा पण पाठिंबा नव्हता .

अशा परिस्थितीमध्ये शिवाजीराजांची आणि जिजाऊसाहेबांची मन:स्थिती कशी झाली असेल ? लक्षात येते ती एकच गोष्ट की , इतक्या भयंकर आणि भीषण मृत्युचे तांडव दिसत असून सुद्धा ही मायलेकरं थोडीसुद्धा घाबरली नाहीत। त्यांचा आत्मविश्वास कायम होता. राजे राजगडावर आपला डाव आखीत होते. त्यांनी फार-फार तर हजारभर मावळी सैन्या सोबत पुरंदरचा किल्ला गाठला होता . तो दिवस होता ८ ऑगस्ट १६४८ . पावसाचे दिवस होते. नीरेला पाणी होत . पुरंदरपासून अवघ्या बारा कि. मी. वर इशान्येला बेलसर गावाजवळ फत्तेखानाची छावणी होती. याच पुरंदरच्या दक्षिणेला दहा कि. मी. वर सुभानमंगळ होता. हा किल्ला  कालपरवा एवढ्यातच फत्तेखानी सैन्याने जिंकून घेतला होता. त्यावर आदिलशाही निशाण लागले होते.


शिवाजीराजांनी रात्रीच्या काळोखात बेलसरजवळच्या शाही छावणीवर अचानक छापा घालण्याचा आणि शिरवळच्या सुभानमंगळावरही हल्ला करून तो किल्ला जिंकून घेण्याचा डाव आखला होता . प्रथम हल्ला सुभानमंगळवर , कावजी मल्हार या सरदाराबरोबर थोडं सैन्य देऊन त्याला पुरंदारावरून सरळ शिरवळवर राजांनी सोडलं. या पावसाळ्यात कावजी वाटेत आडवी येणारी नीरा नदी ओलांडून सुभानमंगळवर हल्ला चढविणार होता. नदीला पूल नव्हता. नावा नव्हत्या. पोहूनच दक्षिण तीरावर जायचे होते. गेले. सुसरीसारखे मराठे गेले . किल्ला बेसावध होता , नव्हे निर्धास्त होता. कावजीने या किल्यावर मावळ्यांनिशी हल्ला चढविला. ते तटावर चढले. घुसले. प्रतिकार होत होता , पण मराठ्यांचा जोश आणि उग्र निर्धार किल्ल्यावरच तुटून पडला होता. युद्ध सुरू झाले . हलकल्लोळ उसळला. मराठ्यांचा मारा भयानक होता. युद्धात शाही किल्लेदारच कावजी मल्हारने कापून काढला. आदिलशाही फौजेची अक्षरश: दाणादाण उडाली होती. मध्यरात्रीच्या अंधारात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळविला. पुन्हा भगवा झेंडा सुभानमंगळवर फडकला. आधी झालेल्या पराभवाने खचून न जाता मावळ्यांनी शत्रूवर आग पाखडली. अचानक केलेल्या हल्ल्याचा हा परिणाम. किल्ला मिळाला होता .


कावजी मल्हार किल्याचा बंदोबस्त करून पुरंदरावर परतला । सारं मराठी सैन्य या विजयानं अधिकच आनंदी झालं होतं . शिवाजीराजांनी पुढच्याच मध्यरात्री बेलसरवर असाच थोड्याशा मावळ्यानिशी लपतछपत जाऊन एकदम हल्ला चढविला. यावेळी भगवा झेंडा एका मावळी तुकडीबरोबर होता. योजनेप्रमाणे राजांनी या मावळी तुकडीला आदेश दिला होता की , तुम्ही वेळेवर लढाईत घुसू नका. आम्ही गनिमांवर हल्ला करतो. अजूनही फत्तेखानाचे सैन्य जे आहे ते आपल्यापेक्षा जास्तच आहे. जमेल तसे आम्ही त्यांचा फडशा पाडतो. पण छावणीत झोपलेले शाही हशम जर आमच्यावर मोठ्या बळांनं चालून आले तर आम्ही माघार घेणार . तुमच्या झेंड्याच्या तुकडीच्या रोखाने येऊ. आपण सारेच पुन्हा पुरंदरवर पोहोचू.

हे छापेबाजीचं म्हणजेच गनिमी काव्याचे तंत्र कायम विजय मिळेपर्यंत चालूच राहणार होतं। राजांनी बेलसरच्या छावणीवर या योजनेप्रमाणे एकदम छापा घातला. कापाकापी एकच कार्यक्रम चालू केला , अत्यंत वेगानं मावळ्यांनी सुरू केला. शाही छावणीत गोंधळ उडाला. फत्तेखान जातीनं उठून मराठ्यांवर तुटून पडला. मराठे ठरल्याप्रमाणे माघार घेऊ लागले. हा पराभव नव्हेच ही युद्धपद्धती होती. गनिमी काव्याचं युद्ध एकाच लढाईत संपत नसते. ते विजय मिळेपर्यंत महिनोनमहिने सुद्धा चालूच राहत होत .


मराठी फौजा माघार घेत पटापट जात होती । काही मराठे सुद्धा युद्धात शहिद झाले। मराठे परत फिरले पण दुसऱ्या बाजूनं भगव्या झेंड्याची मराठी तुकडी उत्साहाच्या भरात शाही छावणीवर तुटून पडली . ही तुकडी नेमकी शाही सैनिकांच्या तडाख्यात सापडली. खुद्द झेंडेवाल्यावरच घाव पडला. त्याच्या हातातील भगवा झेंडा कोसळण्याचा क्षण आला. झेंडा पडणार ? नाही , नाही! कारण तेवढ्यात याच तुकडीतल्या बाजी कान्होजी जेधे या तरुण मुलानं एकदम पुढे जाऊन तो पडत असलेला झेंडा स्वत:च पकडला. बाकीचे मावळे लढतच होते. बाजी जेध्यानं त्यांना माघार घेण्याचा इशारा देत देत लढाई चालूच ठेवली होती. या शथीर्च्या धुमाळीत काही मावळे पडले. पण झेंडा सावरीत बाजी यशस्वीपणे माघारी फिरला. आणि आपल्या साथीदारांच्या सोबत अंधारात गुडूप झाला. ही झेंड्याची तुकडी रक्ताळली होती. पण झेंडा हातचा न जाऊ देता पुरंदर किल्यावर दाखल झाले .


अपेक्षेप्रमाणे हा हल्ला राजांना चांगला जमला होता. झेंडा जात होता , तोही परत आलेला पाहून राजे अंडी झाले . विजय झाली. राजांनी बाजी जेध्याचं शाबासकी गर्जून कौतुक केले. त्यांनी तिथेच त्याचा उल्लेख ‘ सर्जाराव ‘ असा केला. हीच बाजी जेध्यांची पदवी ठरली. आता खासा फत्तेेखान तुडवून काढण्याचा राजांचा निर्धार दहा पटीने वाढला. आत्मविश्वास वाढला. पुरंदर किल्ला मराठी युद्धघोषणांनी दणाणत होता.

Post a Comment

0 Comments